ठिपक्यांची रांगोळी मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप! ज्ञानदा रामतीर्थकरने शेअर केली भावुक पोस्ट.

स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी ही मालिका गेल्या २ वर्षापासून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. स्टार प्रवाहवरील मालिका चांगले कथानक असून देखील बंद होतात, तसेच नवनवीन मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीस येतात. २० नोव्हेंबर पासून लक्ष्मीच्या पाऊलांनी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका बंद होणार असल्याची चर्चा सर्वत्र होती. परंतु ही मालिका २० नोव्हेंबरपासून रात्री १०:०० वा. प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सर्वांची आवडती मालिका ठिपक्यांची रांगोळी लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. याची माहिती अपूर्वा म्हणजेच ज्ञानदा रामतीर्थकरने सोशल मीडिया द्वारे दिली आहे. भावुक पोस्ट ज्ञानदाने शेअर केली आहे. मालिका शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. एकत्रित कुटुंबावर अवलंबून असलेली ही मालिका २ वर्षातचं बंद होणार आहे. या मालिकेतील सर्वच पात्रं प्रेक्षकांची आवडती होती. अप्पू, शशांक, माई, दादा, सुवा, कुकी, पन्ना, मानसी, सुमी, बाबी आत्या या पात्रांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. ठिपक्यांची रांगोळी मालिकेची टीरपी देखील चांगली होती.

मालिकेचे शेवटचे शूट देखील पार पडले आहे. ज्ञानदाने अतिशय भावुक अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. “हाय अप्पू… आजच्या रात्रीची झोप खूप त्रासदायक असेल…कारण उद्या शेवटचा दिवस आहे, याची मी कल्पना करू शकत नाही….कानिटकर वाडा…. आपण दोघेही आपल्या आवडत्या ठिकाणी भेटणार आहोत… पण उद्याचा दिवस आपण साजरा करूया.. लवकरच भेटू… प्रेम” या स्टोरीनंतर ज्ञानदाने आज सुमी म्हणजेच अभिनेत्री नम्रता प्रधानबरोबर मेकअप रुममधला व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ज्ञानदा म्हणतेय की, “शुभ प्रभात…आज आपला शेवटचा दिवस.” त्यानंतर तिने आणखी एक स्टोरी मध्ये लिहीलं, “चला आजचा शेवटचा दिवस अविस्मरणीय करू…”

तर तुम्ही ठिपक्यांची रांगोळी मालिकेला मिस कराल का? तुम्ही अप्पू आणि शशांकच्या जोडीला मिस कराल का? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Leave a Comment

Exit mobile version