शेतकरीच नवरा हवा या मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप या कारणामुळे मालिका झाली लवकरच बंद

शेतकरीच नवरा हवा या मालिकेने अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांची मने जिंकली होती. या मालिकेतील सया आणि रेवा यांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. सया हा शेतकरी कुटुंबातील मुलगा आणि रेवा ही मोठी बिजनेस वूमन. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि सर्व अडथळे पार करत अखेर त्यांचं लग्न झालं. संपूर्ण गावाला त्रास देणाऱ्या काकीसाहेबाना देखील तिने तुरुंगाची हवा खायला पाठवले.


शेतकरीच नवरा हवा मालिकेने लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिका बंद होत असल्याचे कळल्यानंतर प्रेक्षकांना देखील आश्चर्याचा धक्का बसला. एवढी चांगली मालिका का बंद केली असेल? यामागचं कारण काय? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.


सध्या जीव माझा गुंतला आणि सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेचे सेट मुंबईत हलवण्यात आले आहेत. परंतु शेतकरीच नवरा हवा या मालिकेचा सेट मुंबईत हलवणे शक्य नव्हते. कारण ही मालिका पूर्ण शेतीवर आधारित होती. या मालिकेतील बहुतांश कलाकार देखील सातारा जिल्हयातील आहेत. या कारणामुळे शेतकरीच नवरा हवा मालिका बंद होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


या मालिकेतील कलाकारांनी देखील सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. ८ महिन्यांचा प्रवास या मालिकेने पार केला. तर तुम्ही शेतकरीच नवरा हवा या मालिकेला मिस कराल का ते कॉमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment

Exit mobile version