तुमच्या आवडत्या या मराठी कलाकारांचा झाला घटस्फोट

लग्न म्हंटल कि आपल्या डोळ्यासमोर येत ते दुसऱ्या आयुष्याची सुरुवात. काही जण लव्ह मॅरीज करतात तर काही जण अरेन्ज मॅरीज करतात. लग्न झाल्यानंतर ते दोघे नव्या आयुष्याची सुरुवात करत असतात. परंतु लग्न झाल्यानंतर काहीजण आपला संसार शेवट पर्यंत टिकवू शकत नाहीत. लग्नानंतर जर जोडीदारासोबत  मतभेद व्हायला लागले तर घटस्फोटाची वेळ येते. असेच मराठी कलाकारांच्या बाबतीत देखील घडलं आहे. तर आज आपण पाहणार आहोत कि असे कोणकोणते मराठी कलाकार आहेत ज्यांनी लग्नानंतर घटस्फोट घेतला आहे.

सई ताम्हणकर

सई ताम्हणकर आणि अमेय गोसावी यांचे लग्न १५ डिसेंबर २०१३ ला झाले होते. अमेय हा देखील चित्रपटसृष्टीशी संबंधित असून तो एक प्रोड्युसर असून त्याची लोडिंग पिक्चर्स नावाची कंपनी आहे. सई आणि अमेय हे दोघे एकाच क्षेत्रातील असले तरी या दोघांनी कधी एकत्र काम केले नाही. सई आणि अमेय यांनी प्रेमविवाह केला होता. तीन वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी लग्न केले होते. परंतु काही कारणास्तव ह्या दोघांचा घटस्फोट झाला. सईच्या चाहत्यांसाठी हि एक धक्कादायक बातमी होती. सईने अजून पर्यंत दुसरे लग्न केलेले नाही.

2. स्वप्नील जोशी

अभिनेता स्वप्नील जोशी याचा २००५ मध्ये अपर्णा जोशी यांच्याशी प्रेमविवाह झाला होता. परंतु काही कारणास्तव २००९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. २०११ मध्ये स्वप्नील जोशी याने लीना आराध्ये हिच्याशी दुसरे लग्न केले आहे. स्वप्नील आणि लीना याना आत्ता एक मुलगी असून तिचे नाव मायरा असे आहे.

3. शर्मिष्ठा राऊत

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिचे लग्न अमेय निपाणकर यांच्यासोबत झाले होते. परंतु त्यांचा संसार फार काळ टिकू शकला नाही. लग्नानंतर काही दिवसातच त्यांचा घटस्फोट झाला. शर्मिष्ठाने अजून दुसरे लग्न केले नसून ती अजून सिंगलच आहे. आत्ता ती हे मन बावरे या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे.

4. रुपाली भोसले

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री रुपाली भोसले हिचं लग्न मिलिंद शिंदे यांच्याशी २०१२ मध्ये झालं होतं. परंतु काही कारणास्तव त्यांच्यात देखील घटस्फोट झाला. अभिनेत्री रुपाली भोसले आत्ता अंकित मगरे याला डेट करत असून ते दोघे कधी लग्नबंधनात अडकणार याची उत्सुकता सर्व रसिक प्रेक्षकांमध्ये आहे. स्वतः रुपालीने आपण अंकितला डेट करत असल्याचा खुलासा केला होता.

5. तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर

होणार सून मी ह्या घरची फेम अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता शशांक केतकर खऱ्या आयुष्यात देखील विवाहबंधनात अडकले. परंतु काही दिवसातच शशांक आणि तेजश्री यांच्यातील मतभेदामुळे त्यांच्यात घटस्फोट झाला. अभिनेता शशांक केतकर याने २०१७ मध्ये प्रियांका ढवळे हिच्यासोबत दुसरे लग्न केले असून तेजश्री मात्र अजून सिंगलच आहे.

6. महेश मांजरेकर

प्रसिद्ध मराठी अभिनेते महेश मांजरेकर यांचा देखील घटस्फोट झाला आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव दीपा असे होते. नंतर त्यांनी अभिनेत्री मेधा मांजरेकर यांच्याशी दुसरे लग्न केले.

7. गिरीश ओक

अग्गबाई सासूबाई फेम अभिनेते गिरीश ओक यांचे देखील खऱ्या आयुष्यात दोनदा लग्न झाले आहे. गिरीश ओक यांच्या पहिल्या पत्नीचे नाव पद्मश्री पाठक असे आहे. पद्मश्री पाठक यांच्या मुलीचे नाव गिरीजा गोडबोले असे आहे. ती देखील मराठी कलाविश्वात एक सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे. अभिनेते गिरीश ओक यांनी पल्लवी ओक यांच्याशी दुसरे लग्न केले असून त्यांना आत्ता एक लहान मुलगी देखील आहे.

8. पियुष रानडे

अभिनेता पियुष रानडे यांचे देखील खऱ्या आयुष्यात दोनदा लग्न झाले आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव शाल्मली टोळे असून २०१० मध्ये पियुष आणि शाल्मली विवाह बंधनात अडकले. चार वर्षानंतर २०१४ मध्ये दोघे कायमचे विभक्त झाले. शाल्मली पासून वेगळे झाल्यानंतर पियुषने अभिनेत्री मयुरी वाघ सोबत दुसरा संसार थाटला. अस्मिता या मालिकेच्या सेटवर पियुष आणि मयुरी यांच्यात ओळख झाली होती. भेटीचे रूपांतर प्रेमात झाले आणि नंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

9. स्मिता गोंदकर

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री स्मिता गोंदकर हिचे लग्न सिद्धार्थ बांठिया यांच्यासोबत झाले होते. परंतु त्यांचं हे लग्न खूप काळ टिकू शकलं नाही. काही दिवसातच ते विभक्त झाले.

10. रेशमी टिपणीस

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री रेशमी टिपणीस हिचे लग्न प्रसिद्ध अभिनेते संजीव शेठ याच्याशी झालं होतं. तब्बल ११ वर्ष एकत्र राहिल्यानंतर त्यांनी २००४ मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आत्ता रेशम संदेश कीर्तिकर याना डेट करत आहे.

Tags: divorced marathi actors, marathi actors divorce, marathi actress divorce

Leave a Comment

Exit mobile version