पिरतीचा वनवा उरी पेटला मालिकेतील अर्जुन आणि सावी यांच्या नात्याला नवी सुरुवात!

कलर्स मराठीवरील सर्वच मालिका लोकप्रिय आहेत. त्यातील पिरतीचा वनवा उरी पेटला ही मालिका अगदी कमी वेळात प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. या मालिकेतील नवनवीन ट्विस्ट आणि अर्जुन सावीच्या प्रेमाची कबुली आपल्याला पाहायला मिळाली. पिरतीचा वनवा उरी पेटला या मालिकेतील अर्जुन आणि सावी यांचं लग्न नुकतेच झाले आहे. काही दिवस अगोदर त्या दोघांनी प्रेमाची कबुली दिली होती. अर्जुन ने सावीच्या गळ्यात मंगळसूत्र घालत लग्न केले आहे.

दोघांनी घरच्यांना न सांगता लग्न केलं आहे. अगदी साध्या पद्धतीने अर्जुन आणि सावीचं लग्न पार पडलं आहे. जेव्हा दोघेही लग्न करून घरी जातात, तेव्हा कोणालाही लग्नाबद्दल काहीच कल्पना नव्हती. सावीचे सिंदूर आणि मंगळसूत्र पाहून सर्व चकित झाले. तेव्हा अर्जुनच्या घरी सर्वांना लग्नाबद्दल कळले.

कृष्णाई आणि नंदा यांचा अर्जुन आणि सावीच्या लग्नाला विरोध आहे. अर्जुन आणि सावी जेव्हा आशिर्वाद घेण्यासाठी जातात तेव्हा, कृष्णाई म्हणते आम्हाला हे लग्न मान्य नाही.

अर्जुन आणि सावीच्या लग्नाने काही लोक खुश नाहीत. आता भिमा सदन मध्ये त्या दोघांच्या लग्नाने कोणते वादळ निर्माण होईल? हे पुढचा भाग पाहिल्यानंतरच कळेल.

Leave a Comment

Exit mobile version