हे मन बावरे मालिका बंद होण्यामागचं खरं कारण आलं समोर

लॉकडाउन काळात अनेक मालिकांच्या चित्रीकरणामध्ये अडथळा येत होता. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक मालिकांच्या शूटिंगची ठिकाणांमध्ये बदल करण्यात आले. त्यामुळे जुन्या मालिका संपवून त्याजागी नवीन मालिका सुरु करण्यात आल्या.

लवकरच कलर्स मराठी वाहिनीवर ‘सुखी माणसाचा सदरा’ हि नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक केदार शिंदे दिग्दर्शित सुखी माणसाचा सदरा या नव्या मालिकेतून अभिनेता भरत जाधव आपल्याला छोट्या पडद्यावर अभिनय साकारताना दिसणार आहे.  या नव्या मालिकेचे प्रोमोज सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अभिनेता भरत जाधव आपला सदरा शोधताना दिसत आहे. या मालिकेत भरत जाधव आणि केदार शिंदे या हिट जोडीचा अभिनय आपल्याला पाहायला मिळणार आहे.   

दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच २५ ऑक्टोबरला हि नवी मालिका कलर्स मराठीवर सुरु होणार आहे. त्यामुळे कलर्स मराठीवरील ‘हे मन बावरे’ हि लोकप्रिय मालिका बंद होणार असल्याचे समजते. हे मन बावरे या मालिकेला ३ वर्षे पूर्ण झाली असून या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहे. 

तर मित्रांनो हे मन बावरे ही मालिका बंद व्हावी की नाही यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Tags: He Mann Baware Serial End, He man baware serial off air

3 thoughts on “हे मन बावरे मालिका बंद होण्यामागचं खरं कारण आलं समोर”

  1. Please dont allow the serials to stretch fpr three years….every story should hv a limited episodes..which will make it crisp and keep the audience glued

    Reply
  2. ही मालिका नक्कीच बंद करा.इतक्या सुंदर मालिकेचे हे भीषण रुप बघवत नाही.इतके चांगले कलाकार आहेत.माझी सगळयात आवडती मालिका.पण कुठे थांबायचे न कळल्यामुळे वाहवतगेलेलीमालिका.त्यामुळे बघायची कधीच बंद केली.काका ,काकू,वहिनी व अनूच्या पहिल्या नवर्याची बहिण(नाव आठवत नाही)याचा आचरटपणा पाहवेना.
    इतका अतीरेक की अनू सिध्दार्थ बाजूलाच पडले.त्या दोघांच्या लग्ना पर्यंतच मालिका बघण्याजोगी होती.इतका दुष्टपणा दाखवून काय मिळते.नात्यातले प्रेम दाखवायचे का दुष्टपणाचा कळस.मंदार सरांकडून ही अपेक्षा नव्हती.1 वर्षात मालिका संपलीच पा हिजे.देवाशपथ ही त्यांची मालिका सर्व द्रुष्टीने चांगली होती.समाजाला चांगले बघायला द्या.वाईट तर सध्या खूपच बघायला मिळतेय.थोडक्यात जी मालिका २ वर्षांपूरवीच बंद व्हायला पाहिजे ती आता नक्की बंद करा. ……वैतागलेला प्रेक्षक.

    Reply

Leave a Comment

Exit mobile version