‘मनं झालं बाजिंद’ या मालिकेत राया देणार होळीच्या दिवशी कृष्णाला घटस्पोट पेपर

झी मराठी वरील ‘मनं झालं बाजिंद’ ही मालिका खुप रंजक वळणावर आली आहे. यामध्ये सध्या राय सन्मानाने कृष्णाला घरी घेऊन जाताना आपण पहिले आहे. पण रायाला भीती आहे ती गुरुजींनी सांगितलेल्या भाकिताची. याच गोष्टीचा धस्का घेऊन राया कृष्णाला घराबाहेर काढणार आहे.

भाऊसाहेब रायाला सांगतात की, कृष्णाला सगळ खर सांगून टाकायला सांगून पण राया न ऐकता कृष्णाला खेचत माचाणाकडे घेऊन जातो. आणि आजपासुन तुझ माझ नातं संपल असं कृष्णाला सांगतो. कृष्णाला आपल्यापासून दुर कस ठेवायच हा विचार करत राया शेवटी घटस्पोट घेण्याचा निर्णय घेतो. होळीच्या दिवशीच राया कृष्णाला ते घटस्पोट पेपर देतो पण ते पेपर होळी मध्ये पेट घेतात. या सगळ्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा येणार की, त्यांच नातं पुन्हा रुळावर येणार हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे.

पण गुरुजींनी सांगितलेल भाकीत खरं ठरणार का ? राया आणि कृष्णा एकत्र राहिले तर कृष्णाचा मृत्यू होणार का ? तुम्हांला काय वाटतं हे कॉमेंट्स मद्धे नक्की सांगा.

Leave a Comment

Exit mobile version