तेजश्री प्रधानच्या प्रेमाची गोष्ट मालिकेमुळे स्टार प्रवाह वरील ही मालिका होणार बंद ?

स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आली आहे. या वाहिनीवरील सर्वच मालिका लोकप्रिय आहेत. स्टार प्रवाह वरील मालिका नेहमीच trp च्या बाबतीत अव्वल स्थानावर असतात. रंग माझा वेगळा, मुरांबा, ठरलं तर मग, तुझेच मी गीत गात आहे, आई कुठे काय करते, ठिपक्यांची रांगोळी , सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिका खूपच लोकप्रिय आहेत.

तेजश्री प्रधानची प्रेमाची गोष्ट ही नवी मालिका ४ सप्टेंबर पासून रात्री ८:०० वा. प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक तेजश्रीच्या मालिकेसाठी खुप उत्सुक आहेत. ही मालिका ये है मोहब्बते या हिंदी मालिकेचा रीमेक आहे असं म्हटलं जातं.

रंग माझा वेगळा ही मालिका रोज रात्री ८:०० वा. आपण स्टार प्रवाह वर पाहत असून, प्रेमाची गोष्ट ही मालिका देखील ४ सप्टेंबर पासून रात्री ८:०० वा. प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावरून रंग माझा वेगळा मालिका बंद होणार की काय? अशी शक्यता वर्तवली जात आहे. रंग माझा वेगळा या मालिकेचा वेळ बदलला गेला तर दुसरी कोणती मालिका बंद होईल? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. तुम्हाला कोणती मालिका बंद होईल असे वाटते? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा. स्टार प्रवाह वरील तुमची आवडती मालिका कोणती? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Leave a Comment

Exit mobile version