‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका होणार बंद? ही मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

स्टार प्रवाहवरील स्वाभिमान – शोध अस्तित्वाचा ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका होती. परंतु या मालिकेने लवकरच प्रेक्षकांचा निरोप देखील घेतला. अक्षर कोठारी आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांनी या मालिकेत मुख्य भूमिका साकारल्या होत्या. पल्लवी आणि शांतनूची जोडी प्रेक्षकांना फार आवडायची. या मालिकेनंतर अक्षर कोणत्याही मालिकेत आपल्याला दिसला नाही. सध्या तो एका नव्या कोऱ्या मालिकेसोबत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मालिकेचे नाव लक्ष्मीच्या पाऊलांनी असे आहे. ही मालिका स्टार प्रवाह वर २० नोव्हेंबर पासून, रात्री ९:३० वा. प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रोमो पाहता अक्षर कोठारी आणि ईशा केसकर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. लक्ष्मीच्या पाऊलांनी या नव्या कोऱ्या मालिकेत तीन बहिणीची आणि तीन भावांची कथा दाखवण्यात आली आहे. ईशा केसकर आणि तिच्या २ बहिणी आहेत, तसेच या तीन बहीणींची आई अभिनेत्री किशोरी अंबीये दाखवण्यात आल्या आहेत. ईशा केसकर ही गरीब घराण्यातील दाखवण्यात आली आहे. तिची आई किशोरी अंबीये आपल्या तिन्ही मुलींचे स्थळ अक्षर कोठारी आणि त्याच्या दोन भावांसाठी घेऊन जाते. अक्षर हा मोठ्या घराण्यातील दाखवण्यात आला आहे.

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका रात्री ९:३० प्रसारित होणार असून, या जागी कोणती मालिका बंद होणार? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. सध्या सुख म्हणजे नक्की काय असतं? ही मालिका आपण रात्री ९:३० वा. पाहतो. यामुळे सुख म्हणजे नक्की काय असतं? ही मालिका बंद होणार असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू आहेत.

तुम्हाला काय वाटतं कोणती मालिका बंद होईल? जर सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका बंद झाली तर तुम्ही या मालिकेला मिस कराल का? तसेच अक्षर आणि ईशा यांची नवी मालिका लक्ष्मीच्या पाऊलांनी पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Leave a Comment

Exit mobile version