सांग तु आहेस का मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

स्टार प्रवाहवर सिद्धार्थ चांदेकरची ‘सांग तु आहेस का’  ही मालिका प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. ही मालिका सुरू झाली ती ७ डिसेंबरपासुन. हळुहळु मालिकेचा trp देखील कमी होत गेला. या मालिकेतील सर्वच कलाकार अगदी उत्तमरित्या अभिनय साकारत आहेत. या मालिकेत आपल्याला लवस्टोरी आणि रहस्य यांचा मिलाफ पाहायला मिळाला.

सिद्धार्थ चांदेकर, शिवानी रांगोळे, सानिया चौधरी आणि बाकी सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली.  या मालिकेच्या जागी लवकरच ‘जय भवानी जय शिवाजी’ ही नवी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत आपल्याला अभिनेता भूषण प्रधान हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भुमिकेत दिसणार आहे. तब्बल ८ वर्षानंतर भूषण प्रधान आपल्याला टीव्ही मालिका क्षेत्रात दिसणार आहे. या मालिकेत त्याची दमदार भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहे.

 तर तुम्ही सांग तु आहेस का या मालिकेला मिस करणार का ? आणि नविन येणाऱ्या मालिकेसाठी उत्सुक आहात का हे आम्हांला कॉमेंट्स करून नक्की सांगा.

Leave a Comment

Exit mobile version