सगळ्यांची आवडती जोडी पाठक बाई आणि राणा दा यांचा अक्षय तृतीयच्या शुभमुहूर्तावर साखरपुडा संपन्न.

झी मराठी वरील ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका आणि या मालिकेतील राणा अंजलीच्या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. मालिका संपल्यानंतर देखील ही जोडी प्रेक्षकांच्या अजूनपर्यंत लक्षात आणि मनात राहिली. आणि हीच जोडी आता खऱ्या आयुष्यात देखील एकत्र येतायत.  

काल अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर हार्दिक आणि अक्षया या जोडीने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली. अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर या दोघांचा साखरपुडा संपन्न झाला. त्यांच्या या बातमीने चाहते भलतेच खुश झालेत. खऱ्या आयुष्यात देखील या जोडीला एकत्र पाहायला चाहत्यांना देखील खुपच आवडतय. या साखरपुड्यासाठी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील टीम उपस्थित होती.

A TO Z Marathi कडून हार्दिक आणि अक्षयाचे खुप खुप अभिनंदन .

Leave a Comment

Exit mobile version