हार्दिक जोशीचं पार पडलं केळवण, सोशल मीडियावर शेअर केले फोटो.

हार्दिक जोशीचं पार पडलं केळवण, सोशल मीडियावर शेअर केले फोटो.

झी मराठी वरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमधून घराघरात पोहोचलेली जोडी म्हणजे राणादा आणि पाठक बाई. ही ऑनस्क्रीन जोडी आता लवकरच आयुष्यभरासाठी एकत्र येणार आहेत. काही महिन्यांपूर्वी हार्दिक आणि अक्षयाचा साखरपुडा पार पडला. अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली नाही. पण या दोघांच्या लगिणघाईला सुरवात झाली आहे. नुकतेच हार्दिकचे केळवण पार पडले.

हार्दिकचे केळवण बहीणीकडे साग्रसंगीत पार पडल. केळीच्या पानावर अस्सल मराठमोळी पद्धतीने हे केळवण पार पडलय. ‘बहिणीकडून केळवणाची सुरवात’ असं कॅप्शन देत हार्दिकने फोटो शेअर केला आहे.

तर दुसरीकडे पाठकबाई म्हणजेच अक्षया देखील तिच्या मैत्रिणींसोबत साऊथ इंडिया मध्ये bride to be ची पार्टी एंजॉय करताना दिसून येतेय.

हार्दिक आणि अक्षयाची जोडी बिग बॉस मराठी सीजन 4 मध्ये दिसणार अश्या जोरदार चर्चा प्रेक्षकांमद्धे सुरू आहेत. तर तुम्हाला या दोघांना बिग बॉस मध्ये पाहायला आवडेल का ? हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.

atozmarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *