Tharal Tar Mag 12 June Episode : अर्जुन ने घेतला सायलीचा मुका, लागली प्रेमाची चाहूल..

Tharal Tar Mag 12 June Episode : ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात सायली खूप चिडलेली असते, ती स्वतःशीच बड बड करत असते, प्रेमाच नाटक म्हणे इतक्या जवळ कोणी जात का? मला तर तुमच्या जवळ कोणी आलेल अजिबात आवडत नाही.

मी पण जरा अतीच चिढले, आणि त्यांच्या भाजीत जास्त तिखट घालून ठेवलं, आता यांना तीखटाचा जास्त त्रास झाला तर.. काय करू मी? गोड शिरा करू का? म्हणजे यांना तिखटाचा त्रास नाही होणार. आणि सायली शिरा करायला घेते.

इकडे प्रिया घरी येते तर सुमन तिला म्हणते की, तू खूप दमली असशील ना, थांब मी तुझ्यासाठी चहा करते. हे सगळं नागराज पाहत असतो. तो प्रिया ला म्हणतो की, आज तन्वी तर सर्वगुण संपन्न वाटतेय, तेव्हा प्रिया म्हणते की, तन्वी च माहित नाही पण प्रिया मात्र हे सगळं करू शकते. तुम्हा तिघांना मी गप्प बसवलच आहे, आता किल्लेदार ला करायचं आहे. आणि ती निघून जाते.

इकडे अर्जुनच्या ऑफिस मध्ये अर्जुन चैतन्य ला बोलत असतो की, मला कळत नाहीये की, सायली अशी का वागतेय, त्यांना माहित आहे की, प्रिया बरोबरच्या प्रेमाच्या नाटकामुळे मधुभाऊ लवकर सुटणार आहेत. तरीसुद्धा त्या अश्या का वागतायत.

Tharal Tar Mag Sayali

तेव्हा चैतन्य म्हणतो मला एक काळात नाहीये की, तुझी नेमकी प्रारोरिटी काय आहे, मधुभाऊना सोडवणं की, मधुभाऊना सोडवणून सायलीला प्रपोज करन. तेव्हा अर्जुन म्हणतो दोन्ही. पण मला हा सेकंड ऑप्शन करता येत नाहीये..तोच प्रॉब्लम आहे,

चैतन्य म्हणतो की, मला तुमची लव्हेस्टरी खूप कॉम्प्लिकेटेड वाटतेय. मला हे सगळं काही झेपत नाहीये, सो मी जेवायला बसतोय तू पण जेवण करुन घे. तो सांगतो हे बघ तुझ्यासाठी सायली वहिनीने तुझ्या आवडीची भेंडीची भाजी बनवली आहे. आणि तू उगाच त्यांना दोष देत होता. खूप कॉम्प्लिकेटेड लव्हेस्टरी आहे बाबा तुझी लव स्टोरी.

अर्जुन खूप खूश होतो आणि तो डब्बा घेऊन जेवायला बसतो, भिंडीचा एक घास खाणार तेवढ्यात, सायली तिथं येते आणि अर्जुन ला म्हणते की, ती भेंडीची भाजी खाऊ नका.तेव्हा चैतन्य म्हणतो का खायची नाही? सायली म्हणते की तुम्ही खाऊ शकता फक्त हे नाही खाऊ शकत.

अर्जुन म्हणतो याला काय अर्थ आहे, मी सांगितलेली एकही गोष्ट तुम्हाला ऐकायची नसते, पण तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट मी ऐकायची अस का? मी काही ऐकणार नाही, मी तर भाजी खाणार. आणि तो खायला लागतो, सायली अर्जुनच्या हातातून डब्बा खेचून घेते, आणि त्याला शिरा खायला देते.

अर्जुन म्हणतो याला काय अर्थ आहे, मला भाजी खायची आहे, तेव्हा सायली म्हणते की नाही खाऊ शकत तुम्ही कारण, मी तुमच्या डब्ब्यातल्या भाजीत जास्तीच तिखट टाकल आहे. तुम्हाला शिक्षा म्हणून. अर्जुन म्हणतो मला कसली शिक्षा, सायली म्हणते की तुम्हाला ती प प्रिया वार प्रेम करायचा युक्ती सुचली ना म्हणून.

Tharal Tar Mag

चैतन्य हसू लागतो, आणि त्याला ठसका लागतो, तो म्हणतो खूप कॉम्प्लिकेटेड आहे बाबा हे सगळं. मी एक काम करतो बाहेर जाऊन सुरेश सोबत जेवण करतो. आणि तो निघून जातो. अर्जुन सायली ला समजावतो की, मी तन्वी सोबत प्रेम करणार नाहीये तिच्यासोबत प्रेमाच नाटक करणार आहे. अर्जुन म्हणतो समजा मी तन्वी सोबत खर प्रेम केल, हे ऐकताच सायली अर्जुनच्या अंगावर पदर खोचून जाते. अर्जुन सायलीच हे रूप बगून खूप घाबरतो.

अर्जुन सायलीला समजावतो की, जर मी तन्वी वर प्रेम केलं तरी तुम्हाला का प्रॉब्लम आहे. तुम्ही कूट माझ्यावर प्रेम करत आहात. आपण तर कंट्रॅक्ट लग्नामध्ये आहोत ना. याउलट तुम्ही या मार्गाकडे मधू भाऊंना सोडवण्याचा बेस्ट मार्ग अस बगीतल पाहिजे.

सायली मनातल्या मनात विचार करते की, मला कळतंय की या नाटकामुळे प्रिया खुनाबद्दल खर बोलेल, पण वळत नाहीये. तुमच्यावर प्रेम करणाऱ्या बायकोने हे नाटक कसं सहन करायच. पण मधू भाऊ सुटण माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे.

सायली म्हणते की, तुम्ही प्रिया बरोबर नाटक करू शकता. अर्जून म्हणतो की फाइनली तुम्ही माझ्यावर ट्रस्ट केलंच. सायली म्हणते विश्वास तुमच्यावर आहेच पण त्या प्रिया वर नाहीये. अर्जुन खूश होतो आणि शिरा खायला लागतो. सायली म्हणते की, पण हे नाटक करायला तुम्हाला प्रिया शी भेटायला लागेल. आणि तुम्ही तिच्या घरी सुद्धा जाऊ शकत नाही, कारण रविराज सरांना डाऊट येईल. प्रिया ला बाहेरच भेटल पाहिजे आणि तीच रोजच रूटीन काय असतं हे कळायला हव, त्यासाठी तिच्या जवळच्या व्यक्तीची मदत घ्यावी लागेल.

इकडे सुभेदारांच्या घरी अस्मिता ला भूक लागेली असते, ती विमल आणि सायली ला हाका मारत असते. आणि म्हणते मला काहीतरी बनवून द्या रे. तिथच पूर्णा आजी बसलेली असते, ती अस्मिता ला सांगते की, विमल बाहेर आहे आणि सायली सुद्धा अर्जुनचा डब्बा घेऊन त्याच्या ऑफिस ला गेलीय. अस्मिता म्हणते की पूर्णा आजी सुभेदारांच्या सूनेला हे शोभत का , नवरा थोड्या वेळासाठी ऑफिस ला गेला की लगेच ही पण जाते मागे मागे.

पूर्णा आजी म्हणते हो शोभत. नवऱ्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे, तू पण शिक काहीतरी सायली कडून. तुझा सुद्धा संसार अगदी सुरळीत चालेल मग. अस्मिता म्हणते लगेच गोडवे नको गाऊस तिचे. पूर्णा आजी म्हणते की अस्मिता अग राग सोड आता. पूर्णा आजी अस्मिता लाच किचन मध्ये पाठवून खायला बनवायला सांगतात.

अर्जुन आणि सायली ऑफिस मध्ये प्रियाच दिवसभराच टाइम टेबल कोणाला माहीत असेल याचा विचार करत असतात. सायलीला सुमनच नाव आठवत आणि सायली तिला कॉल करते. सुमन सायलीला सांगते की प्रिया आज रात्री जीएम रोड च्या एका कैफ़े मध्ये जाणार आहे. सुमन सायलीच कौतुक सुद्धा करते. सायलीला वाईट वाटतं की आपण सुमन शी खोटं बोललो आणि तिने मात्र माज कौतुक केलं. अर्जुन सायलीला समजावतो की, कधी कधी खोटं बोलव लागत. आणि तुम्ही किती क्यूट आहात अस म्हणून गाल ओढून सायली ला किस करतो. यामुळे दोघही खूप लाजतात. आणि ते दोघं कैफ़े ला जायला निघतात.

पूर्णा आजी ने अस्मिता ला उपमा करायला किचन मध्ये कामाला लावलेल असतं. अस्मिता खुप चिडलेली असते. तेवढ्यात कल्पना तिथे येते आणि अस्मिता ला किचन मध्ये काम करताना पाहून, पूर्णा आजी ला विचारते हे काय झाल हिला. पूर्णा आजी सांगते की मी च लावल आहे काम करायला. कल्पना ला पाहून अस्मिता खूप कुश होते आणि म्हणते की मम्मा तूच बनव आता. पूर्णा आजी म्हणते की पण मला तुझ्या हातचा खायचा आहे उपमा.

सायली आणि अर्जुन कैफ़े मध्ये येऊन बसलेले असतात. ते विचार करत असतात की, आज प्रिया येईल की नाही. नाही आली तर उद्या आणखी सुमन ताईना खोट बोलाव लागेल आपल्याला. इतक्या तिथे प्रिया येते.

प्रिया आल्याच पाहून अर्जुन आणि सायली भांडायला सुरुवात करतात. पहिल्यांदा तर सायलीला काय बोलाव ते कळत नाही, पण नंतर दोघही खूप भांडायला लागतात. सायली म्हणते की तुम्ही मला फक्त काम करण्यासाठी घरी ठेवल आहे. ना मला गिफ्ट देता, ना मला सिनेमा बगायला घेऊन जाता. अर्जुन ही सायली वर खूप ओरडत असतो.

प्रिया हे बगून खूप खूष होते. ती विचार करते की अस्मिता तर सांगत होती की, अर्जुन घरी बायको बायको करत मागे फिरत असतो हिच्या. मग आता काय झाल असेल.

शेवटी अर्जुन सायलीला म्हणतो की, तुम्हाला यायचं असेल तर चला नाहीतर खड्यात जा. आणि तो निघून जातो सायली कागदावर लिहिलेली स्क्रिप्ट पाहते तर त्यावर खड्यात जा.. हे लिहिलेलं नसतं. आणि तिला त्याचा खूप राग येतो.

पुढच्या भागात सगळं सुभेदार कुटुंब जेवायला बसलेलं असतं. अर्जुन सायलीला लोणचं मागतो. अपान सायली त्याकडे पूर्ण पने दुलर्श करते . चैतन्य हे बगून म्हणतो की आजकाल जगाच तापमान खूप वाढलं आहे. यावर चर्चा करायला हवी.

आणखी वाचा :

अशोक सराफ यांची फेव्हरेट मालिका कोणती, स्वतः सांगितल..

ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील अप्पू ला भेटली ही नवीन मालिका, दिल खास सर प्राइज!

Leave a Comment