या मराठी मालिकांच शूटिंग होणार दुसऱ्या राज्यात

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोविडच्या वाढत्या प्रभावामुळे राज्य सरकारने ३० एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लादले आहेत. आणि या कारणांमुळे टीव्ही मालिका आणि चित्रपटांच शूट थांबवण्यात आले आहेत . ‘सुख म्हणजे नक्की काय असत आणि ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेचे निर्माते आदिनात कोठारे यांनी सध्याचे मालिकेचे चाललेले शूटचे लोकेशन दुसऱ्या राज्यात हलविण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी सकाळी तो हैदराबादला शूटसाठी नवे लोकेशन पाहायला रवाना झाला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 या तातडीच्या निर्णयाबद्दल बोलताना आदिनाथ म्हणाला की, “महाराष्ट्रात शूटला परवानगी नाही, म्हणून मी हैद्राबादमधील फिल्म सिटीमध्ये नव्या जागेची पाहणी करीत आहे.”  आणि महाराष्ट्रात शूटची परवानगी येईपर्यंत शूटची ठिकाणे हलवण्याच्या संदर्भात अनेक टीव्ही प्रॉडक्शन हाऊसमध्ये चर्चा सुरू असल्याच कळत आहे.   

तर तुम्हांला सुख म्हणजे नक्की काय असतं आणि दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिका आवडतात का हे आम्हांला कॉमेंट्स मद्धे नक्की सांगा .

Leave a Comment