जीव माझा गुंतला मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप!

जीव माझा गुंतला ही प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक मालिका आहे. कलर्स मराठीवरील सर्वांची आवडती ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आज म्हणजेच १६ सप्टेंबरला जीव माझा गुंतला मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे. या मालिकेचा ७५४ वा भाग आज पूर्ण होणार आहे. ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्यामुळे प्रेक्षक देखील नाराज आहेत. मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर देखील भावुक पोस्ट शेअर केली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या मालिकेतील अंतरा, मल्हार, सुहासिनी, चित्रा आणि श्वेता या पात्रांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. अंतरा आणि मल्हार यांची जोडी देखील प्रेक्षकांना फार आवडायची. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत होती. जीव माझा गुंतला मालिकेची शूटिंग सर्वप्रथम गुजरात, त्यांनंतर कोल्हापूर आणि काही दिवसांपूर्वी मुंबईला सुरु झाली होती. गेली अडीच वर्षे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले होते.

जीव माझा गुंतला या मालिकेच्या जागी कोणती मालिका येणार आहे? हे अद्याप कळले नाही. तुम्ही जीव माझा गुंतला या मालिकेला मिस कराल का? अंतरा आणि मल्हारच्या जोडीला तुम्ही मिस कराल का? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Leave a Comment