चंद्र आहे साक्षीला मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप

कलर्स मराठी वाहिनी वरील ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे . आणि त्याच्या पाठोपाठ अजुन एका मालिकेने देखील प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ती मालिका म्हणजे ‘चंद्र आहे साक्षीला’ . या मालिकेत अभिनेते सुबोध भावे, अभिनेत्री ऋतुजा बागवे , अभिनेता अस्ताद काळे यांसारखे दिग्गज कलाकार झळकत असुन सुद्धा ही मालिका बंद करण्याची वेळ आली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मालिका सुरू होऊन जास्त दिवस झाले नाही पण तरीही मालिका बंद करण्याची वेळ आलीये . कारण मालिकेला हवा तसा trp मिळत नाहीये . मालिका सुरू झाली ती ११ नोव्हेंबरपासून आणि मालिकेचा शेवट झाला तो १७ एप्रिलला .  

मालिका बंद झाल्याने या मालिकेतील कलाकार भावुक झाले आहेत . त्यांनी एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत मालिकेला बाय बाय केल आहे. अभिनेता सुबोध भावे यांनी पोस्ट शेअर करत म्हंटल आहे की, ‘चंद्र आहे साक्षीला’ एक अध्याय संपला . मनपूर्वक धन्यवाद. कलर्स मराठी आणि चिन्मय मांडलेकर एक वेगळी भूमिका साकार करायला दिल्याबद्दल आणि माझ्या सर्व सह कलाकाराचे ही आभार आणि प्रेम आणि तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे आभार. भेटतो लवकरच एका नव्या रूपात. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.

 तर तुम्हांला ही मालिका आवडत होती का ? हे आम्हांला कॉमेंट्स करून नक्की सांगा.

https://www.youtube.com/watch?v=njRraUbKDaY

Leave a Comment