स्वप्नील जोशी पहिल्यांदाच निर्मात्याच्या भूमिकेत, १ मे २०२४ रोजी होणार चित्रपट प्रदर्शित !

स्त्री हा निसर्गाचा मास्टरपीस आहे… बायकांना जग चालवायला दिले तर युद्ध होणार नाही, फक्त एकमेकांशी न बोलणारे देश असतील…अशा अनेक टिप्पण्या बायकांबद्दल केल्या जातात आणि विशेषणे लावली जातात. नेमक्या याच स्वभाववैशिष्ट्यांवर आधारित, गमती-जमतींवर आधारित, एका अगदी धमाल चित्रपटाची निर्मिती करत आहेत मराठीतील आघाडीचे कलाकार. स्वप्नील जोशीची पहिलीच चित्रपट निर्मिती असलेला ‘नाच गं घुमा’ नावाचा हा … Read more

आणि तो अद्भुत प्रवास संपला………. संग्रामने भावुक पोस्ट शेअर करत मानले आभार!

योग योगेश्वर जय शंकर ही कलर्स मराठीवरील पौराणिक मालिका. या मालिकेला प्रेक्षक चांगलीच पसंती देत होते. मालिकेचा trp देखील चांगला होता. परंतु ही मालिका बंद झाली आहे. १४ ऑक्टोबरला योग योगेश्वर जय शंकर या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित करण्यात आला. त्याचबरोबर कस्तुरी ही मालिका देखील बंद करण्यात आली आहे. या मालिकेत शंकर महाराजांचा जीवन प्रवास … Read more

दिल दोस्ती दिवानगी चित्रपटाचा दिमाखदार प्रीमियर!

ट्रेलर पासून उत्सुकता निर्माण करणाऱ्या ‘दिल दोस्ती दिवानगी’ या चित्रपटाचा शानदार प्रीमियर सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. चित्रपटाच्या निर्मीती आणि दिग्दर्शनाचे मनापासून कौतुक करत चित्रपट पसंतीची पोचपावती मान्यवरांनी दिली. ‘उत्तम युथफूल थ्रिलरपट’ अशा शब्दात उपस्थितीतांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे. कलाकारांच्या अप्रतिम अभिनय संगीता सोबतच दर्जेदार निर्मितीमूल्यांचा वापर आणि वेगात घडणाऱ्या घटना हे देखील ‘दिल … Read more

‘खरंच तिचं काय चुकलं?’मध्ये रोशन विचारे प्रमुख भूमिकेत !

नाटक-मालिका आणि चित्रपट यांमधून प्रेक्षकांना आपलंसं करणारा एक गोड चेहरा म्हणजे रोशन विचारे. अलीकडेच आलेल्या ‘खरंच तिचं काय चुकलं?’ या सोनी मराठीवरील रहस्यमय मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत आपल्याला रोशन पाहायला मिळणार आहे. रोशनने आजपर्यंत साकारलेल्या अनेक भूमिकांपैकी ‘खरंच तिचं काय चुकलं?’ या मालिकेतील त्याची भूमिका काहीशी वेगळी आहे. श्रेयस अग्निहोत्री… गडगंज श्रीमंत होतकरू तरुण… आभा निवासचा … Read more

कस्तुरी मालिका या कारणामुळे झाली बंद..

छोट्या पडद्यावरील मालिका सर्वसामान्य प्रेक्षकांच्या घरातील विषय घेऊन प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात. यात काही मलिकांना यश मिळतं तर काही मालिका अपयशी ठरतात. असंच काहीसं झालंय ते कस्तुरी या मालिकेविषयी. कस्तुरी ही मालिका २६ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. सुरुवातीला प्रेक्षकांकडून मालिकेला खास असा प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु समर आणि कस्तुरी यांचे लग्न झाल्यापासून … Read more

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका होणार बंद? ही मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

स्टार प्रवाहवरील स्वाभिमान – शोध अस्तित्वाचा ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका होती. परंतु या मालिकेने लवकरच प्रेक्षकांचा निरोप देखील घेतला. अक्षर कोठारी आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांनी या मालिकेत मुख्य भूमिका साकारल्या होत्या. पल्लवी आणि शांतनूची जोडी प्रेक्षकांना फार आवडायची. या मालिकेनंतर अक्षर कोणत्याही मालिकेत आपल्याला दिसला नाही. सध्या तो एका नव्या कोऱ्या मालिकेसोबत प्रेक्षकांच्या … Read more

तमन्ना भाटियाच्या पहिल्या-वहिल्या मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल!

अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या पहिल्या-वहिल्या मुलाखतीच्या व्हिडिओ ने सोशल मीडिया वर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओ मध्ये तमन्नाचा प्रवास तर दिसून येतोच आहे पण तिच्या भूतकाळाची झलक देतो. गेल्या काही वर्षांत तिच्या अतुलनीय प्रवासाची आठवण करून देतो. तमन्नाने 2005 मध्ये “चांद सा रोशन चेहरा” मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करून नंतर तेलुगू, तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय … Read more

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातचा दाक्षिणात्य अंदाज!

चतुरस्त्र अभिनेत्री वनिता खरातचा मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या आजवरच्या सगळ्याच भूमिकांचं त्यांनी कौतुक केलंय. मराठी सोबत हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये ती दिसत असते, त्यामुळे कोणत्या नव्या भूमिकेत ती दिसणार? हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक असतात. आता मराठी, हिंदीनंतर ती दाक्षिणात्य चित्रपटामध्ये दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या वनिताचा … Read more

खतरों के खिलाडीने मला भविष्यासाठी अभिनेता म्हणून तयार करण्यात मदत केली – शिव ठाकरे

लढाऊ भावनेचा विचार केला तर रिअ‍ॅलिटी शो स्पर्धक शिव ठाकरे मिस्टरअनस्टॉपेबल आहे. खतरों के खिलाडी सीझन 13 मधील टॉप 5 मध्येही त्याने आपले स्थान निश्चित केले आहे. रोडीज सहभागी, बिग बॉस मराठी सीझन 2 चा विजेता, बिग बॉस सीझन 16 फर्स्ट रनर अप म्हणून शिव ठाकरेने वारंवार त्याच्या चाहत्यांची मनं जिंकली आहेत. आणि आता, तो … Read more

दिल दोस्ती आणि दिवानगी!

नवे मित्र मैत्रिणी, नव्या ओळखी, मजामस्ती, उत्साह आणि उन्माद म्हणजे कॉलेजलाईफ. ‘दिल दोस्ती दिवानगी’ सगळं तिथं अनुभवायला मिळतं. ही सगळी धमाल आपल्याला ‘दिल दोस्ती दिवानगी’ या चित्रपटातून येत्या १३ ऑक्टोबरला चित्रपटगृहांत पहायला मिळणार आहे. ट्रान्स इंडिया मिडिया अँड एन्टरटेनमेन्टची प्रस्तुती असलेल्या ‘दिल दोस्ती दिवानगी’ चित्रपटाची निर्मिती राजेंद्र राजन यांची असून शिरीष राणे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. … Read more