या कारणामुळे आई कुठे काय करते मालिकेवर प्रेक्षक नाराज

स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांच्या फार पसंतीस उतरत होती . परंतु मालिकेमद्धे सध्या सुरू असलेल्या ट्रॅक मुळे प्रेक्षक भडकले तर आहेतच परंतु नाराज देखील आहे. काही प्रेक्षकांनी या मालिकेवर टीका करत ही मालिका बंद करा आम्ही पाहणार नाही असेही म्हंटले आहे. या मालिकेत सध्याच्या भागात दाखवण्यात येतय की अभि आणि अनघाचा साखरपुढ्यात अभिला अंकिताचा फोन येतो ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे अभि लगेचच अंकिताकडे निघून जातो . याचाच अर्थ अभिने अनघा सोबतचा साखरपुडा मोडल आहे. पुढे तो अंकिताला गावच्या घरी घेऊन येतो आणि या वेळी अंकिताच्या गळ्यात मंगळसूत्र पाहायला मिळत. तिने आत्महत्या करू नये म्हणून अभिने तिच्यासोबत लग्न केल असाव असं दिसून येतय. आणि यामुळे प्रेक्षक मालिकेच्या निर्मात्यांवर प्रचंड नाराज आहेत. मालिकेत अभि आणि अनघाचा साखरपुडा मोडल्याने प्रेक्षकांनी ही मालिकाच बंद करा असे म्हंटले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 तर यावर तुमच मत काय हे आम्हाला कॉमेंट्स मद्धे जरूर सांगा.  

Leave a Comment