शेतकरीच नवरा हवा या मालिकेतील गुणाजी म्हणजेच अभिनेता जितेंद्र पोळ अडकला विवाह बंधनात !

शेतकरीच नवरा हवा ही मालिका पूर्ण महाराष्ट्रभर घराघरांत पोहचलेली मालिका आहे. या मालिकेने खुप कमी वेळेत प्रसिद्धी मिळवली आहे. या मालिकेतील नवनवीन ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतात. या मालिकेतील गुणाजी, धनाजी आणि सयाजी या पात्रांना प्रेक्षक खुप पसंत करतात. या मालिकेतील सयाजीचा मोठा भाऊ गुणाजी म्हणजेच अभिनेता जितेंद्र पोळ रीयल लाइफ मध्ये विवाह बंधनात अडकला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अभिनेता जितेंद्र पोळने त्याच्या लग्नाची माहिती सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत दिली आहे. अस्मिता पांडे असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. अस्मिताने वरमाळा घालतानाचा फोटो पोस्ट केला आहे. दोघेही खूपच खुश दिसत होते. दोघेही लग्नाच्या जोड्यामध्ये खुप सुंदर दिसत होते. त्यांनी जांभळ्या कलरची मॅचिंग केली होती. जितेंद्र आणि अस्मिता यांना बऱ्याच कलाकारांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

तुम्हाला जितेंद्र आणि अस्मिताची जोडी कशी वाटली? आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा.

Leave a Comment