अभिनेता हार्दिक जोशी छोट्या पडद्यावरून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला राणादा प्रेक्षकांचा आवडता कलाकार बनला होता. याच मालिकेतून त्याला जास्त प्रसिद्धी आणि ओळख मिळाली. ही मालिका संपल्यानंतरही प्रेक्षक राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशीला मिस करतायत .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अभिनेता हार्दिक जोशी यानंतर पुन्हा कोणत्या नविन मालिकेत झळकणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष होते. प्रेक्षकांची ही इच्छा लवकरच पुर्ण होणार आणि अभिनेता हार्दिक जोशी लवकरच आपल्याला एका नविन मालिकेतून भेटीला येणार आहे . प्रेक्षक देखील हार्दिकला छोट्या पडद्यावर पाहायला उत्सुक आहेत.

झी मराठी वाहिनीवर ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला. यात आपण अभिनेत्री अमृता पवार हिला पहिल. या मालिकेत नायक कोण असेल हा प्रश्न प्रेक्षकांमद्धे होता. यात नायक म्हणून अभिनेता हार्दिक जोशी असणार आहे. आणि ही मालिका ३० ऑगस्ट पासुन आपल्या भेटीला येणार आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील अंजली आणि राणादची जोडी प्रेक्षकांना खुप आवडली आणि आता नव्या मालिकेत हार्दिक आणि अमृताच्या जोडीला प्रेक्षक किती पसंती देतायत हे पाहणे रंजक ठरणार आहे.

तर तुम्ही हार्दिकला या नविन मालिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा.

Leave a Comment