अभि आणि अनघा बद्दल बरचं काही

स्टार प्रवाह वाहिनी वरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सगळ्यांनाच आवडतेय. एका आईची गोष्ट सांगणारी ही मालिका आहे. या मालिकेतील सर्वच कलाकारांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. सर्व कलाकारांचा अभिनय देखील प्रेक्षकांना खुपच भावतोय. या मालिकेतील गौरी आणि यश ची जोडी तर सगळ्यांना आवडतेच पण आता अभि आणि अनघाची जोडी देखील प्रेक्षकांना आवडायला लागली आहे. या मालिकेत अभि आणि अनघाच्या लग्नाचा ट्रॅक आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे.  आई सोडून बाकी  घरच्यांना मनवून अभि अनघा सोबत कस लग्न करणार आहे हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 तर आज आपण जाणून घेणार आहोत अनघा आणि अभिच्या खऱ्या आयुष्याबद्दल .

 अनघा म्हणजे अभिनेत्री अश्विनी महांगडे हिचा जन्म २७ ऑक्टोंबर १९९० मद्धे झाला असुन ती मुळची वाई साताऱ्याची आहे. तिने तिच शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण हे वाईतच पुर्ण केल आहे. किसन वीर महाविद्यालयातून तिने वाणिज्य शाखेत पदवी मिळवली. तसेच तिने होटेल मॅनेजमेंटच देखील शिक्षण घेतल आहे.

२०१४ मधील झी मराठी वरील ‘अस्मिता’ ही तिची पहिली मालिका. त्यानंतर त्याच वाहिनीवर तिला ‘स्वराज रक्षक संभाजी’ या मालिकेत राणू अक्काची भूमिका करण्याची संधी मिळाली. तिच्या या पात्राला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यांनंतर तिने ‘चला हवा येऊद्या’ celebrity पॅटर्न या reality show मद्धे देखील अभिनय केला आहे.

त्याचबरोबर तिने वेबसेरीस ,मराठी चित्रपटमद्धेही कामं केलेले आहे. २०१८ मद्धे तीला तिच्या गावकडील गोष्टी या वेबसेरीस साठी प्रेरणा पुरस्कार देखील मिळाला आहे. तसेच मराठी चित्रपटांपैकी टपाल आणि बॉइज मद्धे देखील तिने काम केले आहे.

वेबसेरीस , मालिका ,चित्रपट करता करता तिने स्वतःच प्रॉडक्शन हाऊस देखील काढल आहे. त्याच नाव मोरया प्रॉडक्शन असं आहे. अश्विनी महांगडे ही अभिनेत्री सोबतच एक सामाजिक कार्यकर्ती देखील आहे . तिने रयतेचे स्वराज्य परिपूर्ण किचन हॉटेल ची निर्मिती देखील केली आहे.

 तर आता जाणून घेऊयात अभि बद्दल म्हणजेच अभिनेता निरंजन कुलकर्णी बद्दल.

निरंजनचा जन्म ८ ऑगस्ट १९८९ मद्धे झाला असुन तो मुळचा अंबरनाथचा आहे. निरंजनला दोन बहिणी आहेत. त्याने नाशिक मधील institute of Aeronautic या कॉलेज मद्धे मेकॅनिकल इंजीनीअरिंगची पदवी घेतली आहे. तो कॉलेज मद्धे असताना एकांकिका आणि नाटक यामद्धे भाग घेत असायचा. त्यातच त्याला २०१२ मद्धे झी मराठी वाहिनी वरील ‘उंच माझा झोका’ या मालिकेत काम करायची संधी मिळाली. आणि याच मालिकेद्वारे त्याने TV मालिका क्षेत्रात पदार्पण केल. या मालिकेत त्याने दामोदर अभ्यंग हे पात्र साकारल होत. यानंतर त्याने ‘तु माझा सांगाती , आपलं बुवा असं आहे , गणपती बाप्पा मोरया , जावई विकत घेणे आहे , तु अशी जवळी रहा अशा या अशा मालिकेमद्धे त्याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक स्थान निर्माण केल.

 आणि आता आपण अभिनेत्री अश्विनी महांगडे आणि अभिनेता निरंजन कुलकर्णी यांना आई कुठे काय करते या मालिकेत अनघा आणि अभि ची भूमिका साकारताना पाहतच आहोत .

 तर तुम्हांला ही जोडी कशी वाटते ही कॉमेंट्स मद्धे नक्की सांगा .

Leave a Comment